Home > News Update > उबाठा गटाचे कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन

उबाठा गटाचे कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन

जोपर्यंत पीक विमा कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा उबाठा गटाचा इशारा

उबाठा गटाचे कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन
X

Amravati : पीक विम्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. पीक विमा कंपनीचे अधिकारी विमा देण्यासाठी पैसे मागत असल्याचा धक्कादायक खुलासा केला असून जिल्हा कृषी अधिकारी यांना ऑडियो क्लिप त्यांनी ऐकवली आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा न मिळाल्याने अमरावती जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खडाजंगी झाली. शिवसैनिकांनी पीक विमा अधिकाऱ्यांच्या अंगावर खुर्ची उगारल्याने मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान सर्वेक्षण करतांना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांना पिक विमा मिळाला व ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही, त्यांना विमा मिळाला नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. जोपर्यंत पीक विमा कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा उबाठा गटाने स्थानिक शेतकाऱ्यांनी दिला आहे.

Updated : 26 Dec 2023 10:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top