पूजा चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर तृप्ती देसाईंची मोठी मागणी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 Feb 2021 10:32 AM GMT
X
X
बीड: पूजा चव्हाण हिचा संशयास्पद मृत्यू होऊन आता 13 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही मृत्यूचे सत्य बाहेर आलेले नाही. पूजाच्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे, ला न्याय मिळायला हवा, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील परळीमध्ये जाऊन पूजाच्या कुटुंबियांची भेट घेतली.
पूजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितलंय. राज्यातील एखादा मंत्री गायब कसा काय होऊ शकतो, असा सवालही त्यांनी विचारला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे यासाठी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
Updated : 20 Feb 2021 11:03 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire