मुलभूत सुविधांसाठी आदिवासी बांधव रस्त्यावर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 May 2022 3:02 PM IST
X
X
मुंबईचे जुळे शहर असलेले ठाणे एक प्रगत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण याच ठाण्यातील येऊर गावातील आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर या जनआक्रोश मोर्चा काढत त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. वन हक्क संरक्षण प्रमाणपत्र आणि मुलभूत सुविधा मिळण्यासाठी चार हजार आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले होते.
Updated : 30 May 2022 3:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






