Home > News Update > बालाकोट हल्ल्याचा आधी अर्नब म्हणाला होता...'काहीतरी मोठे होईल'

बालाकोट हल्ल्याचा आधी अर्नब म्हणाला होता...'काहीतरी मोठे होईल'

बालाकोट हल्ल्याचा आधी अर्नब म्हणाला होता...काहीतरी मोठे होईल
X

टीआरपी घोटाळाप्रकरणी दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत असून काल रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यात `काहीतरी मोठे होईल' असे व्हाट्सअप संभाषण उघड झाल्यानंतर देशाच्या सुरक्षाविषयक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहीले आहे. गोस्वामी आणि दासगुप्त राजकारणी, पत्रकार, न्यूज नेटवर्क आणि टीआरपी प्रणालीवर चर्चा करीत असल्याचं उघड झालं आहे.

हे संभाषण 23 फेब्रुवारी 2019 रोजी झाले. त्यानंतर या संभाषणाच्या तिसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारी, 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट शहरात जैश-ए-मोहम्मद प्रशिक्षण शिबिराला लक्ष्य केल्याचे सांगण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रतिक्रिया म्हणून या हल्ल्या करण्यात आला. यामध्ये आत्मघाती हल्लेखोरांनी चालविलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारच्या बसमध्ये धडक दिल्यानंतर 40 केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शहीद झाले. ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन या संभाषणबद्दल आश्चर्य व्यक्त केलं असून हे पुरावे अर्नबला जेलमधे टाकण्यासाठी पुरेसे असल्याचं म्हटलं आहे.

उतार्‍यानुसार, 23 फेब्रुवारी, 2019 रोजी, गोस्वामी यांनी दासगुप्ताला मेसेज पाठवून " काहीतरी मोठे होईल" असं सांगितलं.


14 फेब्रुवारी 2019 च्या एका चाट गोस्वामी म्हणतात "This attack we have won like crazy." "हा हल्ला आम्ही वेड्यासारखा जिंकला आहे." जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा कर्मचार्‍यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर सीआरपीएफच्या 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला होता, त्याच दिवशी हा संदेश देण्यात आला.

25 डिसेंबर रोजी मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे म्हणाले होते की रेटिंग एजन्सीच्या आकडेवारीच्या फॉरेन्सिक ऑडिट अहवालात असे निदर्शनास आले आहे की 2016 पासून हा घोटाळा सुरु आहे. भारंबे म्हणाले की, टिआरपी हेरफेरमुळे रिपब्लिक टीव्ही पहिल्या क्रमांकाचे चॅनेल म्हणून पुढे आले. भारंबे यांनी असेही नमूद केले होते की या अहवालात रेटिंग एजन्सीच्या अधिकारी यांच्या मधील ई-मेल्स आणि चाट यांचा उल्लेख केला गेला होता ज्या "पूर्णपणे बेकायदेशीर आणि कायदा उल्लंघन करणारी" आहेत.

या महिन्याच्या सुरूवातीस, मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले की त्यांना या प्रकरणात गोस्वामीविरूद्ध अधिक पुरावे सापडले आहेत.रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांच्यासह आतापर्यंत या प्रकरणात तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोमिल रामगढिया हे बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्याप्रमाणेच कोठडीत आहेत. शुक्रवारी रात्री दासगुप्तला रक्तदाब आणि साखर पातळीमुळे मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, प्राथमिक तपासणी दरम्यान बॉक्स सिनेमा आणि मराठी वाहिनी फकत मराठी ही इतर वाहिन्यांची नावे तपासात होती.

कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय असं आमदार रोहीत पवार यांनी म्हटलं आहे.भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का?

एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे.

Updated : 16 Jan 2021 9:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top