Home > News Update > ज्यांनी पसरवले विष.. ते म्हणतात, `आता सकारात्मकता ठेवा`!

ज्यांनी पसरवले विष.. ते म्हणतात, `आता सकारात्मकता ठेवा`!

ज्यांनी पसरवले विष.. ते म्हणतात, `आता सकारात्मकता ठेवा`!
X

जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या नेतृत्वाचे आणि आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे जागतिक पातळीवर निघत असताना देशातील माध्यमं आणि समाजमाध्यमातून मान्यवर मंडळी `सिस्टिम` ला दोष देत जळत्या सरणांचे फोटो प्रसिध्द करु नका, `पॉझिटीव रहा` असे उपदेश देत आहेत. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर आणि मरणाची झुंज देणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या वेदनेवर मायबाप सरकार कधी फुंकर घालणार आहे प्रश्न अनुत्तरीत आहे.

भारतात सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. भारतात गेल्या २४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. १५ एप्रिलपासून भारतात दोन लांखाहून अधिक रुग्ण आढळत असून तीन लखांहून अधिक रुग्ण आणि दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे.

देशातील पंतप्रधान आणि प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना आणि कुंभमेळा जोरात साजरा होत असताना जगभरातील माध्यमांनी मागील आठवडाभरात जगभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ' भारतात कोरोनाचा सुनामी' असं सांगत 'चिंताजनक परिस्थिती असल्याचे ठळक वर्णन केले आहे.

विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या कोरोना स्थितीवर उकठोर शब्दात प्रहार केले जात असताना, देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक देखील करण्यात आले आहेत.

कट्टर उजव्या विचारणीच्या प्रचारक असलेल्या पुण्यातील लेखिका शेफाली वैद्य यांनी कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या स्मशानभुमी आणि मृतदेहांचे फोटो शेअर करु नयेत असं ट्विटरवर आवाहम केलं आहे. हे सगळा `पॅंडेमिक पॉर्न`चा प्रकार असून यामुळे जनतेमधे घबराट निर्माण होते. असे फोटो व्हिडीओ शेअर करण्यापेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांचे सकारात्मक फोटो- व्हिडीओ शेअर करावेत असं आवाहन शेफाली वैद्य यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे मोदी सरकार धर्जीनी भुमिका घेण्यासाठी शेफाली वैद्य प्रसिध्द आहे. यापुर्वीही धार्मिक तेढ निर्माण करणारी विधानं करुन त्यांनी वाद निर्माण केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बदनामीकारक मजकुर प्रसिध्द केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला गेला आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णँयाविरोध न्यायालयाची बदनामी होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणी देखील त्यांच्या विरोधात सुप्रिम कोर्टात बेअदबीचा खटला दाखल झाला होता. दिल्लीमधे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला योगेंद्र यादव यांनी पाठींबा दिल्यानंतर शेफाली वैद्य यांनी ट्विटरवरुन त्यांना योगेंद्र यादव तिहार जेलमधे खितपत पडतील असं वक्तव्य केलं होतं. नेहमीच मोदी सरकारची पाठराखन करणारे अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा मोदी राग आवळला असून संज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्या ट्विटवर रिअॅक्ट होत, शेखर गुप्ताजी, तुमच्या दर्जापेक्षा हे जरा अतीच झालं. संपूर्ण जगासाठी 'कोरोना' एक संकट आहे. यापूर्वी अशा संकटाचा सामना आपण कधी केला नाही. सरकारची समिक्षा जरूर केली पाहीजे. टीकाही केली पाहीजे. पण या समस्येशी झुंज देणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तसेही तुम्ही घाबरू नका, येणार तर मोदीच. भाजप सत्तेत येण्यापूर्वी इंधन दरवाढीवरुन टिका करणारे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासह अभिनेते अनुपम खेर यांचा समावेश आहे. २०१२ मधे ट्विट करताना त्यांनी त्यांचा वाहनचालक मोटरसायकल ऐवजी सायकलवर आल्याचे म्हटले होते. कारण वाढत्या इंधन दरवाढीनं त्यानं आपली मोटरसायकल आता शोपीस बनवल्याचं म्हटलं होतं. काश्मिरसह अनेक मुद्द्यांवर मोदी सरकार धर्जिनी भुमिका घेऊन अनुपम खेर यांनी यापुर्वी वाद निर्माण केला होता. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रणौत देखील मोदी सरकारच्या समर्थनार्थ उतरली असून मोदी आपल्या वडीलांनसमान असल्याचं माजी सनदी अधिकारी सुर्य प्रताप सिंह यांच्याशी वाद करताना म्हटलं आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं (Kangana Ranaut news), "तुमच्याकडे जगातील सर्वाधिक लायक नेता असेल तेव्हा तुम्ही स्वतः पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करायला नको. त्यांना पाठिंबा द्या. हाच तुमचा धर्म आणि कर्म आहे.' यावर निवृत्त सनदी अधिकारी (IAS) सूर्य प्रताप सिंह म्हणाले, 'कंगनाजी तुम्ही पंतप्रधानांच्या समर्थक आहात की प्रखर विरोधी? कारण अशा स्थितीत त्यांचा शत्रूच त्यांची प्रतिमा बिघडवण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी असा ट्रेंड करु शकतो. जेव्हा चारी दिशांना मृतदेह आणि मृतदेहच दिसत आहेत तेव्हा हा ट्रेंड म्हणजे अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात फटाके फोडण्याचा प्रकार आहे. आयोडिन युक्त मीठ खात जा बाळा.' कंगनाने या अधिकाऱ्याला उत्तर देताना लिहिलं, "त्या व्यक्तीने आयुष्यभर देशाची सेवा केली आणि त्या बदल्यात त्यांना केवळ राग, द्वेष आणि खोटेपणाच मिळाला. देशाचं नेतृत्व करणाऱ्या अशा व्यक्तीचं मनोबल वाढवणं, त्यांच्या प्रयत्नांची आणि कामाचं कौतुक करणं हा त्यांच्यावर उपकार नाही, तर देशावर उपकार आहे. पंतप्रधान हेच देश आहेत. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असा विचार करायचा असेल तर लोकशाहीचं नाटक कशाला? मतदान करुन आपला प्रतिनिधी निवडण्याचं इतकं खर्चिक काम का करायचं? पंतप्रधान देशासाठी वडिलांसारखे आहेत. त्यांच्या हेतूवर संशय घेणं किंवा त्यांच्या पराभवाची इच्छा ठेवणं मुर्खपणा आहे." 'कंगनाचे ट्विट लिहिणाऱ्याला 8 वीचं नागरिकशास्त्रही माहिती नाही' सूर्य प्रताप सिंह यांनी कंगनाच्या या ट्विट्सवर उत्तर देताना तिची चांगलीच शाळा घेतली. ते म्हणाले, "पंतप्रधान हेच देश आहेत?? कंगनाजी, तुमचे ट्विट्स जो कुणी लिहितोय त्याने 8 वीचं नागरिकशास्त्राचं पुस्तकही वाचलेलं नाही.



लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे जेथे सर्वोच्च शक्ती ही सामुहिकपणे जनतेच्या हातात असते. जनतेकडेच अंतिम नियंत्रण असतं. कृपया थोडा अभ्यास करा." थांबेल ती कंगना कसली. सिंह यांच्या अभ्यास करण्याच्या सल्ल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया देत जनतेचा निर्णय नरेंद्र दामोदर मोदी असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "जनतेचा निर्णय नरेंद्र दामोदर मोदी आहे. म्हणूनच ते पंतप्रधान आहेत. जो अभ्यास केल्यावर सर्व माहिती असतं पण काहीच कळत नाही अशा अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. पुढच्या निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करा तोपर्यंत त्यांना त्यांचं काम करु द्या." एकंदरीत कोरोनाची परीस्थिती बिकट असून जगभरातून देशाच्या नेतृत्वावर टिका होत असून मदत देऊ केली जात असताना भाजप समर्थक भक्तमंडळी आणि मान्यवर मात्र सत्य परीस्थिती स्विकारायला तयार नाहीत ,उलट सकारात्मक रहा, असा उरफटा सल्ला देत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर (Coronavirus in India) आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल जगातील दोन बलाढ्या कंपन्याही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे.



मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करु तशी माहिती दिली. (Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus) भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील, असे सत्या नाडेल यांनी सांगितले.

तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी पुरवाल जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले. गेल्या 24 तासांत देशात 3,52,991 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गेल्या 24 तासांमध्ये भारतात 3,52,991 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2812 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत देशातील 2,19,272 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

Updated : 26 April 2021 6:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top