Home > News Update > हे तर भाजपचे गलिच्छ राजकारण : मुख्यमंत्र्यांचा पलटवार

हे तर भाजपचे गलिच्छ राजकारण : मुख्यमंत्र्यांचा पलटवार

हे तर भाजपचे गलिच्छ राजकारण : मुख्यमंत्र्यांचा पलटवार
X

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या पूर्वसंध्येला वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पत्रकार परीषदेत केला आहे. राजीनामा घेणं, गुन्हा दाखल करुन मोकळे होणं म्हणजे न्याय देणं नव्हे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे. जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

आज संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, केवळ राजीनामा घेणं. हातात काही पुरावे असोत नसो गुन्हा दाखल करून मोकळं होणं म्हणजे कुणाला न्याय देणं असं होत नाही." असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, की न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की तुम्ही सोबत असाल तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसते आरोप करणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचे ते म्हणाले.

ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सखोल तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हेच मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची यंत्रणा असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. यावेळी संसदीय मंत्री अनिल परब यांनी संजय राठोड यांनी लिहलेली राजीनामा पत्र आणि पुजा चव्हाण यांच्या आई,वडील आणि बहीनीचे तपासावर विश्वास असल्याचं पत्र वाचून दाखवलं. या घटनेचा तपास वेगाने व्हावा आणि दोषींना तुम्ही शिक्षा कराल याबाबत आम्हाला खात्री आहे असं पूजा चव्हाण हिच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी केली आहे. सिल्वासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आत्महत्यापत्रात कोणाची नावं आहेत हे पहा असं सांगितलं.

कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे. धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवर कौतुक झालं आहे. सरकारचं सोडा पण तुम्ही कोविड यौद्ध्यांची थट्टा करताय. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्रानं कधी अनुभवला नाही. इतरही काही आरोप केलेत त्या सर्वाची उत्तरं देणार नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावं. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहात सीमाप्रश्न का सोडवला नाही, असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आपण मास्क घालणार नाही असे जाहीर केले आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय?, असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना माझा नमस्कार!

Updated : 28 Feb 2021 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top