Home > News Update > शाळाच व्हेंटिलेटरवर ...शिक्षक करत आहे जीवाचे रान ...

शाळाच व्हेंटिलेटरवर ...शिक्षक करत आहे जीवाचे रान ...

शाळाच व्हेंटिलेटरवर ...शिक्षक करत आहे जीवाचे रान ...
X

आपली शाळा आपले भविष्य असते .पण खेड्यापाडयात शाळा नसतात .आणि जिथं प्राथमिक शाळा आहे ती बंद होते कारण त्या शाळेत म्हणावी तशी पटसंख्या नसते. आता अशीच एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे . पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील गोडांबेवाडीची हि प्राथमिक शाळा आहे . पण हि शाळा वाचवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी हा अवलिया शिक्षक जे प्रयत्न करत आहे ते अफाट आहेत .

या शाळेत पहिली ते चौथी पटसंख्या २० आहे . त्यामुळे या शाळेतील मुलं शिक्षण तर घेत आहेत पण , शाळा केंव्हातरी बंद होईल हि रुखरुख त्यांना आहेच . या प्राथमिक शाळेचे शिक्षक गेली १० वर्ष काम करत आहेत .मुलांना शाळेत रमत यावं यासाठी वेगवेगळे प्रयोग ते करत असतात . शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव देत आहेत . स्वतः गाणी म्हणत ते त्यांना शिकवतात आणि वाचन ,लिखाण करवून घेतात .

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी येथील हि जिल्हा परिषदचे प्राथमिक शाळा आहे . या शाळेत येणारी मुले हि वाडी वस्तीवरची आहेत . त्यामुळे यांना शिक्षणाचे साहित्य आणि खर्च परवडावा यांनी शिक्षण घ्यावं यासाठी शाळेचे शिक्षक विजय वडवेवार प्रयत्न करत आहेत .ते म्हणतात ," या खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या मुलांना शाळा जवळ असली तर शाळेत जाता येते ,हि शाळा जवळ आहे विद्यार्थी आनंदाने शाळेत येतात ,शिकतात . पण जर या चार मुलांचं सुद्धा शिक्षण बंद झालं तर ,यांची चिंता त्यांना सतावत असते . कलम २१ नुसार सर्वाना शिक्षण हे सार्वत्रिक आणि मोफत आहे ,त्यामुळे या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे . पटसंख्या कमी असली तरी हि मूले तरी शिकतील हीच अशा मला आहे " अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे .

त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थांनी सुद्धा त्यांचे मत मांडले आहे , त्यांच्या मते त्यांना शाळा खूप आवडते ,सर ज्या पद्धतीने शिकवतात ते मला खूप आवडते असं ते सांगत आहेत . गेली १० वर्ष शिक्षक विजय वडवेवार हि शाळा चालवत आहेत.विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजेपासून ते त्यांना भविष्यात स्वप्नांची उंच भरारी घेता यावी इतपत ज्ञान या शाळेत दिल जात आहे .

असे शिक्षक आणि शाळा जर समाजात असतील तर नक्कीच वेगळे दृश्य पाहायला मिळेल. फक्त यांच्या प्रयत्नांमुळे समाज आणि प्रशासनाला जाग यायला हवी इतकंच...

Updated : 20 Oct 2022 5:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top