Home > News Update > 'राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे'-विजय वडेट्टीवार

'राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे'-विजय वडेट्टीवार

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे-विजय वडेट्टीवार
X

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारची सतर्क झाले आहे. काल राज्यात कोरोनाचे पाच हजारांहून अधिक रुग्ण सापडलेत. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत बोलताना राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती विस्फोटक आहे. रुग्णसंख्येचा आलेख वाढता आहे. रुग्णदुप्पटीचा वेग एका दिवसावर आला आहे. रुग्णवाढीचा आलेख पाहता जर आपण वेळीच निर्बंध घातले नाहीत तर राज्यात जानेवारी आणि एप्रिलमध्ये कोरोना विस्फोट होऊ शकतो. त्यामुळे आता नियम पाळण्याची जबाबदारी जनतेवर आहे. जर नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही.असं वडेट्टीवार म्हणालेत. लोकल काही काळापूर्वीच सुरू केल्यात आणि रुग्णवाढ झाली. आता तिसरी लाट आली आहे. आता पुन्हा एकदा लोकल आणि शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.

दरम्यान, राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णांनी पाच हजारांचा आकडा पार केला, तर सक्रिय रुग्णसंख्याही १८,२१७ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के, तर मृत्युदर २.१२ टक्के झाला आहे

Updated : 31 Dec 2021 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top