Home > News Update > दाणापुर घटनेची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल ; सवर्णांच्या त्रासामुळे 100 जणांनी सोडले होते गाव

दाणापुर घटनेची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल ; सवर्णांच्या त्रासामुळे 100 जणांनी सोडले होते गाव

दाणापुर घटनेची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल ; सवर्णांच्या त्रासामुळे 100 जणांनी सोडले होते गाव
X

अमरावती : फुले,शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात माणूसकीला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुक्यातील दाणापूर येथे घडली होती. दाणापूर गावातील काही सवर्णांनी अनुसूचित जातीच्या लोकांच्या शेतीकडे जाणारा वहीवाटीचा रस्ता अडवून एका वृद्ध शेतकरी महिलेच्या सोयाबीन गंजी पेटवून दिली होती. सतत येथील सवर्णांकडून अत्याचार होत असल्याने कंटाळून गावातील 100 दलितांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ आश्रय घेतला होता. त्यामुळे या घटनेची चर्चा राज्यात पसरली होती.

दरम्यान या घटनेची दखल थेट अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली आहे, आयोगाने अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी गावात जाऊन पीडितांशी संवाद साधला व शेतीची पाहणी केली,यावेळी आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांनी यावेळी महसूल प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. तर प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर अशी घटना घडली नसती अशी प्रतिक्रिया आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांनी दिली, त्यामुळे पीडित अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तातडीने शेतीच्या वहिवाटीचा रस्ता द्यावा अन्यथा संबंधितांवर कारवाई करू असा इशारा अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आयोग अभ्यंकर यांनी दिला आहे.

Updated : 2 Nov 2021 7:19 PM IST
Next Story
Share it
Top