मणिपूर: सेनेच्या तुकडीवर दहशतवाद्यांचा हल्ला 3 जवानांसह 6 लोकांचा मृत्यू
टीम मॅक्स महाराष्ट्र | 13 Nov 2021 10:01 AM GMT
X
X
मणिपूरमध्ये शनिवारी दहशतवादी संघटनांनी आसाम रायफल्सच्या तुकडीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लष्करातील एक कर्नल, तीन कॉन्स्टेबलसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात लष्करातील कर्नलच्या पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला आहे. हा हल्ला गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजता मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात म्यानमार सीमेजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात मणिपूरची संघटना पीपल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचं बोललं जात आहे.
Updated : 13 Nov 2021 10:01 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire