शासकीय इतमामात सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप
Max Maharashtra | 7 Aug 2019 12:27 PM GMT
X
X
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले. आज दुपारी १२ ते ३ या कालावधीत त्यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. भाजप, कॉंग्रेसह देशातील प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सुषमा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. देशप्रेमी आणि देशकर्तव्य निभावणाऱ्या सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Updated : 7 Aug 2019 12:27 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire