Home > News Update > अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, मुक्काम मात्र तुरुंगातच

अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, मुक्काम मात्र तुरुंगातच

अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, मुक्काम मात्र तुरुंगातच
X

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिला आहे. मात्र तरीही अनिल देशमुख यांचा मु्क्काम तुरुंगातच असणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे 11 महिन्यांपासून 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मात्र उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही अनिल देशमुख यांना दिलासा दिला आहे.

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने केलेले अपील अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे ED प्रकरणात अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही दिलासा कायम आहे.मात्र अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI चौकशी सुरू असल्याने त्यांना ED प्रकरणात दिलासा मिळाला असला तरी त्यांचा मुक्काम तुरुंगात कायम असणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख नोव्हेंबर 2021 पासून अटकेत आहेत. त्यांच्याविरोधात कथीत 100 कोटी रुपयांची वसूली आणि खंडणीचे ED आणि CBI ने आरोप केले आहेत. मात्र मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना दिलासा दिला आहे.

अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर ईडीने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या विरोधात अपील अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालायने ईडीने दाखल केलेला अपील अर्ज फेटाळला.

काय आहे प्रकरण?

2021 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली चारचाकी गाडी आढळून आली. त्यावरून तात्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून अधिवेशनात राज्य सरकारची चांगलीच कोंडी केली. यानंतर या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले व पुढे सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. सचिन वाझे याच्या अटकेनंतर या प्रकरणी तात्कालिन पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांची बदली करण्यात आली. मात्र परमबिर सिंह यांनी थेट तात्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेसाठी रान उठवले. त्यामुळे अखेर अनिल देशमुख यांना 5 एप्रिल 2021 रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

अनिल देशमुख यांचा राजीनामा ते जेल

यानंतर अनिल देशमुख यांची ED कडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर अनिल देशमुख अनेक दिवस अज्ञातवासात होते. या कालावधीत त्यांनी अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र दोन्ही ठिकाणी अनिल देशमुख यांना दिलासा देण्यात आला नाही. त्यानंतर अखेर 2 नोव्हेंबर 2021 रोजी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख हे अटकेत आहेत.

यापुर्वीही दाखल केला होता जामीन अर्ज

अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर 18 मार्च 2022 रोजी त्यांनी पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र यावेळीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या अर्जात प्रकृती अस्वस्थता आणि वाढत्या वयाचे कारण देण्यात आले होते. देशमुख हे 73 वर्षाचे आहेत. तसेच त्यांचा खांदा निखळला आहे. याबरोबरच अनिल देशमुख यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ती मागणी न्यायालयाने फेटाळली.

अनिल देशमुख यांना कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला आहे. तसेच त्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. तसेच आधारासाठी त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागतं. त्यामुळे मानवतेच्या भावनेने अनिल देशमुख यांची जामीनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी जामीन अर्जात करण्यात आली होती.

त्यानंतर उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाच्या विरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळले आहे.

Updated : 11 Oct 2022 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top