शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात विचित्र अपघात; चौघांचा मृत्यू
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Oct 2021 4:41 PM GMT
X
X
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी 7 ते 8 वाहनांची धडक झाली. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला असून, यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली, तर काही गंभीर जखमी झाले आहेत.
शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला.आज रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास 7 ते 8 वाहनांनी मागच्या बाजूने एकमेकांना धडक दिल्याने हा अपघात घडला. यात तीन ते चार चार कार आणि काही ट्रकचा समावेश आहे.
या घटनेत चार चाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे.
Updated : 27 Oct 2021 4:41 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire