Home > News Update > राज्य सरकारची कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत

राज्य सरकारची कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत

राज्यातील दुसर्‍या कोरोना लाटेचा प्रभाव ओसरत असताना ग्रामीण भागात परिस्थिती अजूनही बिकट आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईवमधून कोरोना मुक्त गावांचा गौरव केल्यानंतर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरणा मुक्त गावांची स्पर्धा घोषित केली आहे.

राज्य सरकारची कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत
X

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

· मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे ग्रामविकास विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहेत.

· ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

· याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस – पंधरा (२५१५) व तीस-चोहोपन (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार.

स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात येत आहे.

या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

राज्यात काल 14,123 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 35,949 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 54,31,319 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2,30,681 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.28% झाले आहे. देशात आज अखेर 335,114 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या 94,844 झाली आहे.

Updated : 2 Jun 2021 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top