Home > News Update > "सहनशीलतेचा अंत पाहू नका", राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

"सहनशीलतेचा अंत पाहू नका", राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
X

आवाहन राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता पुन्हा काही प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध आणखी शिथिल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुंबईत मात्र लोकल बंद असल्याने लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकांना लोकल प्रवास करता येत नसल्याने नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर इतर मार्गांनी प्रवासाचा खर्च वाढला आहे, तसेच वेळही जास्त लागत आहे. यामुळे सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सामान्यांचा संतापही आता वाढू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. कोरोनावरील लसीचे दोन ड़ोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

"मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे."

असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

*काय म्हटले आहे पत्रात?*

"गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्माण महाराष्ट्र सरकारने केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण त आत्ये आहेत. पण आजकाल हे निर्माण की कोणासाठी असा आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबईसाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालय सुरु आहेत. सर्वाना घरून काम करता येणे शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली, पण लोकल बंद असल्याने यामध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे बस सुरु आणि लोकल बंद छाने नेमकं काय साध्य होणार ?

ही साथ एकाएकी जाणार नाही असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा साथीबरोबरच राहण्याची सवय देण्याची गरज आहे, आणि त्याला धरूनच योग्य निर्णय उपाययोजना करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असे की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निबंधांच्या प्रतिकडे काही सुचत नाही.

महाराष्ट्र सरकार निर्बंध शिक्षित करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी

आता तातडीने पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसाने आतापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन

करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही उपाय केले गेले नाही तर कडेलोट होईल. त्या परिस्थिती माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहील. परंतु लोकल प्रवास तातडीने सुरु करण्यासाठी आंदोलन करेल.

त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरु केली जावी. विविध प्रकारच्या मोहीमा घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा करतील आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल.

मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार या सगळ्याचा विचार करून त्वरित पावलं उचलेल.

जय हिंद! जय महाराष्ट्र

Updated : 22 July 2021 8:21 AM GMT
Next Story
Share it
Top