शिवसेनेने काढली केंद्र सरकारची अंत्ययात्रा, महागाईवरुन आक्रमक आंदोलन
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 May 2022 12:41 PM GMT
X
X
पेट्रोल-डिझेल, गॅस भाजीपाला तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत, सामान्यलोक वाढत्या महागाईने हैराण आहेत, पण पंतप्रधान मोदी यावर एक शब्दही बोलत नाहीयेत. यावरुनच आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते आहे. केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये शिवसेनेने हे आंदोलन केले आहे. महागाईची आणि केंद्र सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत शिवसेनेने सरकारचा निषेध केला आहे. महागाईच्या विरोधातील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थिती होत्या.
Updated : 21 May 2022 12:41 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire