Home > Max Political > नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का, दीपक केसरकर यांचा सवाल

नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का, दीपक केसरकर यांचा सवाल

नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी  केलेले आरोप खरे मानायचे का, दीपक केसरकर यांचा सवाल
X

नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. या वादात आता माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. आता या वादात नारायण राणे यांनी सुद्धा उडी घेतली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांचं समर्थन करतानाच संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली होती.आता नारायण राणे यांच्या टिकेवरुन माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

सुशांत सिंग प्रकरण हे सीबीआय कडे आहे. ती तुमचीच तपास यंत्रणा आहे. मग जो तपास केला, तो सीबीआय जाहीर का करत नाही. ज्यांचा या प्रकरणाशी कोणताचं संबध नाही. त्यांच्यावर आरोप करायचे बदनामी करायची. राणे ज्यांच्यामुळे घडले. ज्या कुटुंबामुळे ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या बद्दल बोलताना जिभ थोडीतरी चाचरली पाहीजे. संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता, लोकसभेत तुम्हाला उत्तर देता येत नाही मग इथे येऊन का बोलता? जर किरीट सोमय्याच्या पत्रकार परिषदेला पुष्टी देण्यासाठी पत्रकार परिषद घेता. मग तुमच्यावर किरीट सोमय्यानी त्यावेळेस केलेले आरोप खरे मानायचे का, तुम्ही त्यावेळेस सामोरे न जाता लोटांगण घालून तुम्ही भाजप मधे गेलात. सोमय्या कोणाबद्दल बोलले राऊत कोणाबद्दल बोलले त्यात तुम्ही का उडी घेता असा प्रश्न दिपक केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तुम्हाला बोलायचचं असेल तर लोकसभेत चांगला परफॉर्मन्स दाखवा असा टोला दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात चांगले रस्ते आणले. मात्र नितीन गडकरी यांच्या कडील खात राणेंना दिलं. मात्र राणेंनी हे खात मिळालेलं असताना त्यांनी काही केलं नाही. टीका करण्यासाठी हे खात दिलं आहे का? असा प्रश्न दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 18 Feb 2022 9:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top