Home > News Update > महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांची पारनेर येथील प्रयोगशील शेतकरी राहुल रसाळ यांच्या शेतीला भेट

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांची पारनेर येथील प्रयोगशील शेतकरी राहुल रसाळ यांच्या शेतीला भेट

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांची पारनेर येथील प्रयोगशील शेतकरी राहुल रसाळ यांच्या शेतीला भेट
X

राहुरी : हवामान बदलाचा अभ्यास करून पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद , नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या उदिष्टानुसार हवामान अद्यावत विविध तंत्रज्ञानप्रणाली विकसित करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि नाविन्यपुर्ण प्रयोगातून शेती उत्पादन घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन त्या बाबींचा अभ्यास करणे या करिता एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्या आले होते.

या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील युवा उद्यान पंडित राहुल रसाळ यांच्या शेतीला भेट देण्यात आली या अभ्यास दौऱ्यात प्रकल्पातील 15 शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ सुनील गोरंटीवार , सहप्रमुख संशोधक डॉ.मुकुंद शिंदे, प्रकल्पाचे खरेदी अधिकारी डॉ. अतुल अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

राहुल रसाळ यांचा कल हवामान अद्ययावत सेंद्रीय शेती करण्याकडे असून ते द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला उत्पादन घेतात. यामध्ये फल पिकांना स्लरी देण्यासाठी ट्रक्टरचलित स्लरी यंत्र त्यांनी स्वत: तयार केले आहे. त्यांची स्वत:ची जीवाणू प्रयोग शाळा असून त्यांनी हवामान केंद्र उभारले आहे यामध्ये ते विविध सेन्सरचा वापर करतात. यात प्रामुख्याने स्वयंचलित हवामान केंद्र,इ.टी गेज मिटर, पी.एच आणि इ.सी सेन्सर यांचा त्यांनी वापर केल्याची माहीती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

सोबतच फवारणीकरिता परदेशी बनावटीचा इलेक्ट्रोस्टॅटिक ब्लोअरचा ते वापर करतात यामुळे किडनाशकाची 40 टक्के बचत होत असल्याची माहिती त्यांनी दौऱ्यावर आलेल्या संशोधकांना दिली आहे. फवारणीसाठी आर.ओ पाण्याचा वापर ते करतात.त्यासाठी त्यांनी स्वत:चा आर.ओ प्लान्ट देखील उभारला आहे.

या भेटी दरम्यान शेतीबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अभ्यास व अनुभव याची योग्य सांगड घालून नव नवीन प्रयोग केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते. कृषी उत्पादन घेताना ते अंश रहित निर्यातक्षम दर्जाचे असावे याकडेही लक्ष दिले पाहिजे असे मत राहुल रसाळ यांनी व्यक्त केले.

Updated : 1 Sept 2021 4:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top