Home > News Update > संजय राऊत खोटं बोलत आहेत का? त्या मुलाखतीच्या मुलाखतकारांना काय वाटतं?

संजय राऊत खोटं बोलत आहेत का? त्या मुलाखतीच्या मुलाखतकारांना काय वाटतं?

संजय राऊत खोटं बोलत आहेत का? त्या मुलाखतीच्या मुलाखतकारांना काय वाटतं?
X

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी करीम लाला याला भेटायच्या असं वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला, अगदी सरकार पडण्यापर्यंत वेळ आली होती. पण पहिल्यांदाच संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलंय. ज्या मुलाखतीवरुन हे सगळं घडलं त्या गाजलेल्या मुलाखतीचे मुलाखतकार लोकतमचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांन बातचीत केली. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी जे विधान केलं ते बोलण्याच्या ओघात आलं, असं कुलकर्णी यांनी सांगितली. पत्रकारिता क्षेत्रातील लोकांच्या सन्मानाचा कार्यक्रम असल्याने संजय राऊत यांच्या पत्रकारितेच्या काळातील अनुभव जाणून घेण्याच्या दृष्टीने मुलाखत घेण्याचं ठरलं होतं, असंही अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/617358315702478/?t=1

Updated : 17 Jan 2020 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top