#MPSC- राज्य अस्थिर करण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकावण्याचे षडयंत्र : संजय राऊत
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 March 2021 10:27 AM GMT
X
X
महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा आणि सरकारविरोधात तरूणांची माथी भडकवून आगीत तेल ओतण्याचे काम बंद करा असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यानी दिला आहे. रोजगाराचा प्रश्न हा मोदींच्या आर्थिक धोरणातून निर्माण झालाय म्हणून लोकांना रस्त्यावर यावं लागतंय. पण विदयार्थी व तरूणांना भडकावून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये. राज्य अस्थिर करण्याच्या षडयंत्रासाठी तुमचे खांदे वापरा, निरपराध तरूणांचे खांदे वापरू नका, त्यांच्या खांद्यावर ठेवलेल्या बंदुका तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संजय राऊत यांनी दिल आहे.
Updated : 12 March 2021 10:27 AM GMT
Tags: sanjay raut bjp mpsc
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire