Home > News Update > चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी न येण्याचे आवाहन

चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी न येण्याचे आवाहन

चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी न येण्याचे आवाहन
X

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर येऊ नका, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पण काही आंबेडकरी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी मात्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आङे.

"दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमी वर येत असतात, पण गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आपण सर्वांनी राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून डॉ. बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन केले. याही वर्षी ओमीक्रॉन नावाचा विषाणू फैलावत आहे, त्यामुळे सर्व भीमसैनिकांना आवाहन करत आहे की कोठेही गर्दी न करता घरातूनच दूरदर्शन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे" असे खरात यांनी म्हटले आहे.


Updated : 1 Dec 2021 9:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top