Home > News Update > नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही,हा लोकभावनेचा विषय : संजय राऊत

नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही,हा लोकभावनेचा विषय : संजय राऊत

नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही,हा लोकभावनेचा विषय : संजय राऊत
X

औरंगाबादच्या नामांतरवरुन महाविकास आघाडीमध्ये खदखद सुरु असताना बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा उत्तर देत नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही,हा लोकभावनेचा विषय असल्याचं खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. मात्र, आजवर देशात त्यांच्याइतका सेक्युलर राजा झाला नाही. बाबर, निजाम, औरंगजेब ही काही आपली प्रतिकं असू शकत नाहीत. हा देशाच्या आणि राज्याच्या अस्मितेचा विषय आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Updated : 17 Jan 2021 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top