Home > News Update > जख्मी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ!: राजू शेट्टी

जख्मी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ!: राजू शेट्टी

जख्मी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ!: राजू शेट्टी
X

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपने भाजपशासित राज्याचे सर्व आजी माजी मुख्यमंत्री, खासदार आमदार मैदानात उतरवले. तरीही भाजप या ठिकाणी सत्ता मिळवू शकली नाही. भाजपने तृणमूल कॉंग्रेसला हरवण्यासाठी जंग जंग फछाडले.

स्वत: नरेंद्र मोदी यांनी खास बंगालच्या निवडणुकीसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखा पेहराव तयार केला होता. तरीही काहीही उपयोग झाला नाही. भाजपचा पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर आता नेते मोदींवर टीका करत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी फेसबूकला ममता यांचं अभिनंदन करताना मोदींवर सडकून टीका केली आहे.

जख्मी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ ! पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल

#ममता #दीदींचं #अभिनंदन !

त्यांनी आता देशातील भाजप विरोधी आघाडीचं नेत्तृत्व करावं. असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.


Updated : 2 May 2021 1:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top