Home > News Update > पालघरमध्ये मॉब लिंचिंगप्रकरणी १०१ जणांना अटक, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पालघरमध्ये मॉब लिंचिंगप्रकरणी १०१ जणांना अटक, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पालघरमध्ये मॉब लिंचिंगप्रकरणी १०१ जणांना अटक, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
X

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गावकऱ्यांनी तिघांना चोर समजून ठार केल्याप्रकरणी आता पोलिसांनी ११० जणांना ताब्यात घेतले आहे. सुशील गिरी महाराज, जयेश आणि नरेश येलगडे हे तिघे एका कारमधून मुंबईहून सुरतला निघाले आहे. एका व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी ते जात असताना या तिघांपैकी एक जण कार चालवत होता.

पालघर जिल्ह्यातील आतल्या रस्त्यांवरुन ते निघाले होते. पण गडचिंचले गावाजवळ त्यांची कार आली असता गावकऱ्यांना ते चोर असल्याचा संशय आला आणि त्यांच्या कारवर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हल्ला केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबवली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तिघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान याप्रकऱणी ताब्यात घेतलेल्या ११० जणांपैकी ९ जण अल्पवयीन असल्याने ९ जणांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून इतरांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकऱणाची उच्चस्तरीय चौकशी कऱण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच या घटनेविषयी समाजमाध्यमांमधून काही जण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, “ हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत, उगाचच समाजमाध्यमांमधून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस कारवाईचे आदेश दिले आहेत,” असा इशारा दिला आहे.

Updated : 20 April 2020 2:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top