Home > Election 2020 > वंचित म्हणतेय आमचा उमेवार गायब झालाय...

वंचित म्हणतेय आमचा उमेवार गायब झालाय...

वंचित म्हणतेय आमचा उमेवार गायब झालाय...
X

गोवंडी मानखुर्द मुंबई येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा उमेदवार गायब असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण असल्याचं वंचित आघाडीचं म्हणणं आहे.

या संदर्भात पोलिसांनी सुरक्षा कायदा सुव्यवस्था पहावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

महाराष्ट्र हे भयमुक्त राज्य म्हणून ओळखलं जात म्हणून एकाच दिवशी खुल्या वातावरणात निवडणुका होतात आणि हार जीत होत राहते . कधीही भीती नसते.मात्र, हा प्रकार नवीन आहे. याची काळजी आहे.लवकरच आम्ही महाराष्ट्र शासन यांचे 64,000 कोटीं रुपये व्याजा पोटी कसे वाया जातात ते रोखण्याचा अजेंडा आमच्या जाहीरनामा मध्ये घेणार आहोत. असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Updated : 3 Oct 2019 4:39 PM GMT
Next Story
Share it
Top