केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही - अमृता फडणवीस
X
राहुल गांधी यांनी ‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान केलं होतं. या विधानावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी जोरदार टीका केली होती. आणि आता हाच मुद्दा पकडत, फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Rahul Gandhi’s statement is absolutely condemnable!
He is nowhere close to even a single good deed of Veer Savarkar & his greatness.
Not just this,he should not even do the blunder of considering himself as ‘Gandhi’!One cannot become ‘Gandhi’by just keeping his surname as Gandhi!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2019
हे ही वाचा...
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा ?
मी १०१ टक्के ‘हाफ चड्डीवाला’ – नितीन गडकरी
आमदारांची नवी बॅच
“खरं आहे देवेंद्र फडणवीसजी, त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटूंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते” अशी टीका ट्विटरद्वारे केली आहे. त्यामुळं अमृता फडणवीस यांच्या टिकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Very true @Dev_Fadnavis ji ! One cannot be a ‘Thackeray’ also by just putting ‘Thackrey’ surname after his name ! One needs to be true, principled & should think for betterment of people & party members above his own family & power dynamics ! @ShivSena @OfficeofUT https://t.co/3W0AsvcTeG
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 22, 2019