Home > News Update > 'हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत' - नवाब मलिक

'हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत' - नवाब मलिक

मुलीच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी 'अविवाहित लोकांच्या हातात देश आहे, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत', असा खोचक टोला लगावला आहे.  

हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत - नवाब मलिक
X

मुंबई // मुलीच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याबाबत केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत असून, याबाबत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अविवाहित लोकांच्या हातात देश आहे, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

महिलांचे वय २१ झाले, तर मग पुरुषांचे वय २५ केले जाणार का, असा प्रश्न करत जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही. या निर्णयाचा अर्थ असा तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, मोदी सरकार देशाला याच दिशेने घेऊन जायचा प्रयत्न करत आहे का, अशी खोचक विचारणा मलिक यांनी केली, हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत, असा टोला मलिक यांनी लगावला.

जनतेला काय हवे, ते महत्त्वाचे आहे. अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. सज्ञान व्यक्तीला मतदान करण्याचा, पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे, त्याला आपल्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा. १८ वर्षांत मतदानाचा अधिकार आहे. १८ वर्षांत व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केले जाते. पती-पत्नीमध्ये वयाचे अंतर असायला हवे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Updated : 17 Dec 2021 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top