Home > News Update > अनैतिक संबंधाच्या रागातून भाजीविक्रेत्याचा खून;चार आरोपी जेरबंद

अनैतिक संबंधाच्या रागातून भाजीविक्रेत्याचा खून;चार आरोपी जेरबंद

अनैतिक संबंधाच्या रागातून भाजीविक्रेत्याचा खून;चार आरोपी जेरबंद
X

कराड : सातारा जिल्ह्यात तलवारीने वार करत एकाची हत्या करण्यात आली होती या हत्येप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी 24 तासात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ही हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे. वर्गमित्रानेच तीन साथीदारांच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी चौघांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे.

कराड-पुसेसावळी मार्गावर वाघेरी फाटा येथे तलवारीने वार करुन भाजी विक्रेत्याचा शनिवारी रात्री खून करण्यात आला होता. विश्वासघात केल्याच्या रागातून मित्राला संपवल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दीपक ऊर्फ बाळकृष्ण शरद इंगळे , संदीप सुभाष इंगळे , आप्पा ऊर्फ सागर धनाजी इंगळे आणि गणेश विठ्ठल भोसले या आरोपींना ताब्यात घेतले आहे. रमेश रामचंद्र पवार असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , आर्वी येथील रमेश पवार हा शनिवारी रात्री गावातीलच काही जणांसोबत पिकअप जीपमधून भाजीपाला खरेदीसाठी कराडला आला होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण परत आर्वीला जात असताना वाघेरी फाटा येथे पाठीमागून जीपमधून आलेल्या दीपक इंगळे याच्यासह त्याच्या साथीदारांनी त्यांना गाडी आडवी घालत. रमेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चौघांनी रमेशला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच तलवारीने वार करुन निर्घृण हत्या केली.

दरम्यान घटनेची माहिती मिळातच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार आणि उत्तम कोळी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास केला. तपासात आरोपी सातार्‍यानजीक एमआयडीसी परिसरात फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.

Updated : 28 Sept 2021 8:21 AM IST
Next Story
Share it
Top