Home > News Update > कोरोना, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी कडक निर्बंध

कोरोना, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी कडक निर्बंध

राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांनाच मुभा देण्यात आली आहे.

कोरोना, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी कडक निर्बंध
X

मुंबई // राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांनाच मुभा देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यानुसार बंधीस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही सदर मर्यादा 50 करण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021 च्या रात्री 12:00 वाजेपासून अंमलात येणार आहे.

परिपत्रकात पुढे असे ही नमूद करण्यात आले आहे की, अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम 20 असेल. त्याच प्रमाणे राज्यातील पर्यटक स्थळांवर, समुद्रकिनारपट्टी, क्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकृष्ट करणाऱ्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास, 24 डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेले सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) 144 सी आर पी सी लागू करता येईल. या शिवाय आदींच्या आदेशाप्रमाणे लागू सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील

Updated : 31 Dec 2021 2:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top