Home > News Update > मोदी सरकार, मंत्रीपुत्रांचा बचाव करणारं सरकार – शर्मिला येवले

मोदी सरकार, मंत्रीपुत्रांचा बचाव करणारं सरकार – शर्मिला येवले

मोदी सरकार, मंत्रीपुत्रांचा बचाव करणारं सरकार – शर्मिला येवले
X

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. देशाच्या अन्नदात्यासोबत हे सरकार असं कसं वागू शकत? मोदी सरकार ठिकाणावर नाही अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटिझन्स व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला शेतकरी दिल्लीतल्या शेतकऱ्यांसोबत आहे. तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना मारणारं आणि मंत्री पुत्रांचा बचाव करणारं सरकार आहे अशी टीका शेतकरी नेत्या आणि महाराष्ट्रच्या युवा सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केली आहे.

गेल्या वर्षभरापासून शांतेत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचं काम मोदी सरकारने करत आहे. तीन कृषी कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला मोदी सरकार गालबोट लावत आहे त्यांच्या या अन्यायाविरोधात मी महाराष्ट्र शेतकरी कन्या आणि महाराष्ट्र शेतकरी निषेध व्यक्त करत आहोत. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्रतला शेतकरी तोडीसतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा निशाणा मोदी सरकारवर शर्मिला येवले यांनी साधला आहे.

Updated : 5 Oct 2021 3:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top