Home > News Update > कोरोना संपला? वाचा ही बातमी

कोरोना संपला? वाचा ही बातमी

सध्या कोरोनाची तिसरी लाट ओसरली असुन कोरोनाचे निर्बंध हि बऱ्यापैकी शिथिल केले आहे.कोरोना गेला की काय, असे वाटत असतानाच युरोपीय देशात कोरोनाचा उद्रेक होऊ लागलाय.आशिया आणि युरोपीय देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला.आपली सुरक्षा कमी करु नका अशी सुचना दिली आहे.

कोरोना संपला? वाचा ही बातमी
X


सध्या कोरोनाची तिसरी लाट ओसरली असुन कोरोनाचे निर्बंध हि बऱ्यापैकी शिथिल केले आहे.कोरोना गेला की काय, असे वाटत असतानाच युरोपीय देशात कोरोनाचा उद्रेक होऊ लागलाय.आशिया आणि युरोपीय देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला.आपली सुरक्षा कमी करु नका अशी सुचना दिली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसेच आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे.यामध्ये त्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पंचसूत्री धोरणावर लक्ष देण्यास सांगितले आहे.टेस्ट, ट्रॅकिंग उपचार लसीकरण आणि कोरोनाच्या नियमांचे पालन केलं जाव अशी सूचना केंद्राने केली आहे.

राज्यांना कोणत्याही स्थितीत नियमांचं पालन केलं जावं असं सांगितलं असून सामाजिक तसंच आर्थिक गोष्टी सुरळीत सुरु राहाव्यात याकडेही लक्ष देण्यास केंद्राने सांगितलं.

दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर १६ मार्चला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमक आणि शाश्वत जिनोम सिव्केन्सिंग तसंच नीट लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं,असं या पत्रात नमुद केलं आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असं आवाहन केलं आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असं आवाहन केलं आहे. जर नवीन व्हेरियंटची वेळेत माहिती मिळाली तर त्याचा प्रसार होण्यापासून रोखता येईल असं भूषण म्हणाले आहेत.

पत्रात पुढे ते म्हणालेत की, राज्यांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांची आठवण करुन दिली पाहिजे.

भारतामध्ये सध्या करोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून दिवसाला पाच हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी सकाळी देशात २५२८ रुग्ण आढळले. यासोबत एकूण रुग्णसंख्या ४ कोटी ३० लाख ४ हजारांवर पोहोचली आहे.

Updated : 18 March 2022 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top