'मॉब लिंचिंग'ला केंद्राची मूक संमती आहे का ?- नसीम खान
Max Maharashtra | 24 Jun 2019 1:33 PM GMT
X
X
सबका साथ, सबका विकास आणि सब का विश्वास असं म्हणणार केंद्रातील सरकार (मॉब लिंचिंग) जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या घटनांवर गप्प का आहे? अशा घटनांना सरकारची मूक संमती आहे का ? असे अनेक सवाल आमदार तथा माजी मंत्री नसीम खान यांनी उपस्थित केले आहेत.
महिनाभरापूर्वी एका तरुणाची ज्याप्रमाणे जमावाकडून हत्या करण्यात आली हे धक्कादायक आहे. मी त्याचा निषेध करतो. अशा लोकांवर सरकार का कडक कारवाई करत नाही, असा सवालही नसीम खान यांनी उपस्थित केला आहे. अशा घटनांमुळे एक संशयाचे वातावरण निर्माण होत असून 'मॉब लिंचिंग' करणाऱ्याना केंद्र सरकारचा पाठिम्बा आहे का, असा प्रश्न लोकांना पडला आहे. ज्या धर्मनिपेक्ष आणि समभावाच्या नीतीवर हा देश उभा राहिला त्याला कुठे तरी छेद देण्याचे काम येथे सुरु आहे, असेही ते म्हणाले. नवीन सरकार आल्यानंतर या घटनांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अशा घटनांचा आम्ही निषेध करतो असेही ते म्हणाले.
Updated : 24 Jun 2019 1:33 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire