Home > News Update > राहुल गांधी यांच्या आरोपावर मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या आरोपावर मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या आरोपावर मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर
X

राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पिय अधिवेनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारी, महागाई, देशाची आर्थिक स्थिती याबरोबरच पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे संबंध यावर सविस्तर भाषण केले. यामध्ये राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना भाजप नेते आणि मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले.

रविशंकर प्रसाद यांनी नॅशनल हेरॉल्ड, भारत जोडो यात्रा, याबरोबरच आदर्श घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा याबरोबरच बोफोर्स घोटाळ्यांचा संदर्भ देत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच अदानी समुहाला सहाय्य करण्यात भाजप नाही तर काँग्रेसच अग्रेसर असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.

अदानींना डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणींमध्ये गुंतवणूक अशा अनेक वेगवेगळे प्रकल्पांच्या माध्यमातून अदानी समूहाला पैसा कमवण्यासाठी काँग्रेसनेच मदत केल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला. तसेच रविशंकर प्रसाद यांनी चीनबाबत काँग्रेसच्या नीतीचाही काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.

Updated : 8 Feb 2023 3:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top