Home > News Update > एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू- नसीम खान

एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू- नसीम खान

एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू- नसीम खान
X

मुंबई // एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात पाच टक्के आरक्षण दिले. न्यायालयाने ते मान्य केले तरी नंतरच्या काळात तत्कालीन भाजप सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. एकीकडे काँग्रेस आरक्षणासाठी संघर्ष करत असताना एमआयएमचे आमदार मात्र , विधानसभेत अवाक्षरही काढत नव्हते, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केला.

काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण न्यायालयाने मान्य केले होते.मात्र, नंतर सत्तेत आलेल्या भाजपने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष संघर्ष करत होता. मात्र, एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते, परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले होते? त्यांनी फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही, असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला. मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर एमआयएमने मुंबईमध्ये सभा घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर खान यांनी एमआयएमला प्रश्न केला

निवडणूक आल्यावर एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणूक संपली की यांना आरक्षण आठवत नाही. भाजप आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून सत्तेचे राजकारण करणाऱ्या भाजपला एमआयएम साथ देत असते. एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपला अनुकूल राहिली आहे, असेही खान म्हणाले. मुंबई महापालिकांसह राज्यभरातील नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींना मुस्लिमांचा विकास आणि आरक्षण आठवले असे नसीम खान म्हणाले.

Updated : 13 Dec 2021 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top