दिवाळी निमीत्तानं मोदींची ‘मन की बात’
Max Maharashtra | 27 Oct 2019 9:17 AM GMT
X
X
महिण्याच्या शेवटी मनं की बात करणाऱ्या मोदींनी आज दिवाळीच्या पार्श्वभुमीवर मनं की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातुन भारतीय जनतेशी संपर्क साधला. या निमीत्तानं त्यांनी सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. दिवाळीच्या पावन प्रंसगी निर्धार करून मनातले द्वेष भाव दुर ठेउन देशाच्या सर्वागीन विकासासाठी एकनिष्ठ राहु अंस आवाहन मोदींनी जनतेला केलं.
भारतात सर्व धर्म, जाती एकत्र राहतातं याच एकमेव कारणं म्हणजे भारताचं अंखड राहणं. भारताला अंखड ठेवण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केलेतं आणि त्याचं फलीत आज आपल्या समोरं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय पटलावर विचार करण्याची क्षमता इतंरापेक्षा वेगळी होती आणि भारत अंखड ठेवण्यात त्यांच मोलाचं योगदान होतं. भारतात स्टॅचु ऑफ युनीटीमुळं लाखोच्या संख्येनं पर्यटक भारतात येतात आणि त्यामुळं रोजगार निर्मीती होतेयं.
भारत कन्ट्री ऑफ फेस्टीवलचा देश आहे. त्यामुळं भारताला अंसख्य देश जोडले गेले पाहीजे आणि भारताच्या वेगवेगळ्या संणामध्ये इतर देंशानी सहभाग नोंदवला पाहीजे. त्याचप्रंमाण महीलांचा सन्मान करुन प्रेरणा घ्यावी असही मोदी म्हणाले. येत्या ३१ ऑक्टोबरला रन फॉर युनीटी मध्ये सर्वानी सहभाग नोंदवुन फिट अँन्ड फाईन भारताचं स्वप्न पृर्ण करु शकतो. राम मंदीर निर्णयावर देखील देशानं संय्यम दाखवला आहे. अशा प्रकारे नंरेद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला.
Updated : 27 Oct 2019 9:17 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire