Home > News Update > सकल भारतीय समाजाचा मोर्चा ; जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सकल भारतीय समाजाचा मोर्चा ; जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सकल भारतीय समाजाचा मोर्चा ; जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
X

दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी समाजावर होणाऱ्या शासकीय अन्याया विरोधात असलेला राग व्यक्त करण्यासाठी कल्याण सकल भारतीय समाज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून प्रांत कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. प्रांत अधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात समाजातील निरपराध तरूणांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपीचा शोध घ्यावा, अत्याचार रोखन्यास असमर्थ ठरलेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. सतत खून बलात्कार, हल्ले घडण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रात सुरूच आहेत. हे पुरस्कृत अत्याचार मालिका थांबवण्यासाठी कल्याण येथे सकल भारतीय समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.

Updated : 21 Jun 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top