Home > News Update > "मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दिली" - सुमित्रा महाजन

"मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दिली" - सुमित्रा महाजन

मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दिली - सुमित्रा महाजन
X

आज पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात झाली असून. अमळनेर नगरी सजली आहे . आज झालेल्या उद्घाटनपर भाषणात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आपल्या महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "मराठी भाषा ही केवळ संवाद साधण्याचे माध्यम नाही तर ती आपल्या संस्कृती आणि वारशाचा अविभाज्य भाग आहे. मराठी साहित्य संमेलन हे या भाषेची आणि संस्कृतीची जपणूक करण्याचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे."





महाजन यांनी मराठी साहित्यिकांच्या योगदानाचेही कौतुक केले. त्या म्हणाल्या, "मराठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दिली आहे आणि त्याला प्रेरणा दिली आहे. साहित्य संमेलनातून या साहित्यिकांना आणि त्यांच्या कार्याला गौरवण्याची संधी मिळते."

युवा पिढीला आवाहन

महाजन यांनी भाषणाच्या शेवटी युवा पिढीला मराठी भाषा आणि साहित्याचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "आजच्या जगात अनेक भाषा आणि संस्कृती आपल्यासमोर आहेत, पण आपण आपल्या मातृभाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन तुम्ही तुमच्या भाषेची आणि संस्कृतीची समृद्धी अनुभवू शकता."

Updated : 2 Feb 2024 6:41 PM IST
Next Story
Share it
Top