Home > News Update > विजयानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया

विजयानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया

विजयानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
X

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा अधिक जागा मिळवत तिसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळवली आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपवर सडकून टीका केली.

काय म्हणाल्या ममता?

नंदीग्रामची काळजी करु नका. ते विसरा. संघर्षात काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं. नंदीग्राम टी जनता जो विचार करेल. त्याचा मी स्वीकार करेल. मला कसलीही भीती नाही. आपण 221 पेक्षा अधिक जागा जिंकत आहोत. आणि भाजप निवडणूक हारली. केंद्र सरकारने लाख प्रयत्न केले तर आम्ही मोठा विजय मिळवला आहे. हा विजय बंगाल आणि बंगालच्या जनतेचा आहे. बंगालच्या लोकांनी देशाला वाचवलं आहे. मी सांगितलं होतं आम्ही द्विशतक करणार... हा विजय बंगालच्या लोकांनी खेचून आणला. आम्ही सांगितलं होतं. को 'खेला हौबे', खेळ झाला आणि शेवटी आम्ही जिंकलो.

अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी विजयानंतर दिली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराजय करण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या निवडणुकीत ममता यांच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. तरीही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव झाला नाही.

Updated : 2 May 2021 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top