Home > News Update > ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...

ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...

ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
X

आठवड्यापासून राज्यात सत्तानाट्य सुरु आहे .पण ठाकरे सरकारने या आठवडाभरात अनेक निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील महत्वाचे निर्णय झाले आहेत .

औरंगाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे . औरंगाबादच नाव आता संभाजीनगर करण्यास मान्यता दिली आहे.उस्मानाबाद शहराच्या "धाराशीव" नामकरणास सुद्धा मान्यता दिली आहे .नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे

राज्यासाठी हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण लागू करून हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला .अहमदनगर मधील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार असल्याचा तसेच अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता आणि त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे .विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय त्याचबरोबर

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णयसुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे .

शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णयहि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारकडून घेण्यात आले आहेत .

Updated : 29 Jun 2022 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top