मोठी बातमी... लॉकडाऊन 'या' तारखेपर्यंत वाढलं!
X
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्यसरकारने राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या संदर्भात माहिती दिली असून राज्यात पुढील ३१ जुलैपर्यंत Unlock 2.0 राहणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही नियम शिथिल केले होते. यावेळी त्यांनी Unlock 1.0 ची घोषणा केली होती. मात्र, आज Unlock 2.0 चा दुसरा टप्पा जाहीर केला असून आत्तापर्यंत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
काय आहे Unlock 2.0?
दोन जिल्ह्यामधील प्रवासाला बंदी कायम
सर्वसामान्यांना एसटी बसमधून प्रवास करता येणार नाही.
दरम्यान ३० जूननंतर मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा असेल. तोपर्यंत आताचे निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना अधिकार देण्यात आले आहे ते. स्थानिक परिसरात निर्बंध लागू करणाचा निर्णय ते घेऊ शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानगी सुद्धा त्यांना देण्यात आली आहे.