राज्यात लॉकडाऊन वाढणार का? काय म्हणाले राजेश टोपे?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 May 2021 9:09 AM GMT
X
X
महाराष्ट्रात 15 मार्च पर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सध्या राज्यात दिवसाला 50 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील रुग्णवाढ थांबलेली आहे. मात्र, त्यामध्ये घट होताना दिसत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी राजेश टोपे यांनी
महाराष्ट्रात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असं विधान करत राज्यात लॉकडाऊन कायम राहण्याचे संकेत दिले आहेत.
Updated : 8 May 2021 9:09 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire