दिलासादायक : राज्यात 24 तासात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली
X
कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढू लागल्याने संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासातील आकडेवारीमुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 27 हजार 918 रुग्ण आढळले आहेत. तर 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4 तासात २३ हजार ८२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २३ लाख ७७ हजार १२७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९६ % एवढा आहे.सध्या राज्यात १६ लाख ५६ हजार ६९७ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १७ हजार ६४९ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ३ लाख ४० हजार ५४२ एक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. गेल्या 24 तासात मुंबईत 4 हजार 760 रुग्ण आढळले आहेत. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात 3287 रुग्ण आढळले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात 40 हजार रुग्ण आढळून आले होते. पण सोमवारी ही संख्या तब्बल 9 हजारांनी कमी झाली तर मंगळवारी आणखी कमी होऊ ही संख्या 27 हजारांवर आली आहे.






