कंत्राटदाराकडून कमिशन मागितल्याप्रकरणी भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा
X
ना खाऊंगा ना खाने दुंगा या पंतप्रधान मोदींच्या धोरणाला भाजपचीच सत्ता असलेल्या कर्नाटकात धक्का पोहोचला आहे. बांधकाम कंत्राटदाराच्या आत्महत्येमुळे अडचणीत आलेले कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री के.एस. ईश्वरप्पा हे अखेर राजीनामा देणार आहेत. उडड्पी येथे राङणारे बांधकाम कंत्राटदार संतोष पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आत्मत्या केली होती. रस्त्याच्या कामासाठीचे चार कोटींचे बिल संतोष पाटील यांना सरकारकडून मिळणार होते. पण बिलातील ४० टक्के रक्कम मंत्री ईश्वरप्पा यांनी मागितली, असा आरोप संतोष पाटील यांनी केला होता, त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली होती.
या प्रकरणी मंत्री ईश्वरअप्पा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण तरीही त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली नाही. संतोष पाटील यांच्या मृत्यूचे कारस्थान पोलीस चौकशीत उघड होईल, तोपर्यंत आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी ईश्वरप्पा यांनी चर्चा केली. त्यानंतर “ईश्वरअप्पा यांनी स्वत:हून राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे, ते शुक्रवारी संध्याकाळी आपला राजीनामा देणार आहेत, त्यामुळे या प्रकरणात विरोधकांनी तपास यंत्रणा आणि न्यायालयाचे काम करणे बंद करावे, चौकशीअंती सत्य समोर येईल,” असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. ईश्वरअप्पा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने तीव्र आंदोलन सुरू केले होते.
भ्रष्टाराच्या आरोपामुळे भाजपशासित राज्यात मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे भाजपला देखील हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते आहे.






