Home > News Update > ``निम्मी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय``? कमल हासन

``निम्मी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय``? कमल हासन

``निम्मी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय``? कमल हासन
X

दक्षिणात्य राज्य असलेल्या तामिळनाडूमधे आगामी विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. सुपरस्टार रजनीकांतनं स्वतंत्र पक्षाची घोषणा केल्यानंतर आता मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हासन यांनी "देशातील निम्मी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?" असा सवाल थेट पंतप्रधान मोदींना विचारला आहे. न्यायप्रविष्ठ असलेले राजधानी दिल्लीत नवं संसदभवनाचे भुमिपुजन मोदींनी नुकतचं केलं.

सर्वाच्च न्यायालयानं बांधकाम आणि तोडकामावर स्थगिती दिली असून भुमिपुजनाला सशर्त परवानगी दिली होती. जुनं संसद भवन कायम ठेऊन तब्बल एक हजार कोटी खर्चून सेंट्रल विस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीनं आता दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील राजकारणात रस वाढविला आहे. नुकतंच सुपरस्टार रजनीकांत यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.




देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल कमल हासन यांनी आता विचारला आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. स्थगिती दिलेल्या नव्या संसदेच्या प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत निर्णय होणार आहे.

Updated : 6 Sept 2022 2:54 PM IST
Next Story
Share it
Top