``निम्मी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय``? कमल हासन
X
दक्षिणात्य राज्य असलेल्या तामिळनाडूमधे आगामी विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. सुपरस्टार रजनीकांतनं स्वतंत्र पक्षाची घोषणा केल्यानंतर आता मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हासन यांनी "देशातील निम्मी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?" असा सवाल थेट पंतप्रधान मोदींना विचारला आहे. न्यायप्रविष्ठ असलेले राजधानी दिल्लीत नवं संसदभवनाचे भुमिपुजन मोदींनी नुकतचं केलं.
सर्वाच्च न्यायालयानं बांधकाम आणि तोडकामावर स्थगिती दिली असून भुमिपुजनाला सशर्त परवानगी दिली होती. जुनं संसद भवन कायम ठेऊन तब्बल एक हजार कोटी खर्चून सेंट्रल विस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीनं आता दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील राजकारणात रस वाढविला आहे. नुकतंच सुपरस्टार रजनीकांत यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
சீனப்பெருஞ்சுவர் கட்டும் பணியில் ஆயிரக்கணக்கான மக்கள் மடிந்து போனார்கள். மக்களைக் காக்கத்தான் இந்தச் சுவர் என்றார்கள் மன்னர்கள். கொரோனாவால் வாழ்வாதாரம் இழந்து பாதி இந்தியா பட்டினி கிடக்கையில்,ஆயிரம் கோடியில் பாராளுமன்றம் கட்டுவது யாரைக்காக்க?
— Kamal Haasan (@ikamalhaasan) December 13, 2020
(1/2)






