Home > News Update > 'हा' तर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष, जयंत पाटील

'हा' तर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष, जयंत पाटील

हा तर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष, जयंत पाटील
X

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असून केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा मिळत नसल्याचं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग असल्याचा टोला लगावला होता.यावर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे . कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली.

महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राला ८५ लाख लसी मिळाल्या आहेत. मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या आहे १२.३० कोटी तर अक्टिव्ह रुग्णसंख्या जवळपास ४. ७३ लाख इतकी आहे. गुजरातला ८० लाख लसी मिळाल्या तिथे लोकसंख्या ६.५० कोटी आहे तर अक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास १७ हजार आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र, तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही . महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये. अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्रसरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहे. काय म्हटलं होतं डॉ. हर्षवर्धन यांनी?केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त झालेला असताना महाराष्ट्र सरकार फक्त वसुलीमध्ये व्यस्त आहे.

राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे .महाराष्ट्र सरकारने तर कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली. केंद्र सरकारने सातत्याने महाराष्ट्र सरकारला सल्ले दिले. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. असं म्हणत कोरोना लसीचा तुटवडा असल्याचा आरोपही निराधार असून राज्यातील काही नेते लसीचा तुटवडा असल्याचे सांगून राज्य सरकारचे कोरोना संसर्ग रोखण्यातील अपयश लपवत असल्याचाही आरोप हर्षवर्धन यांनी केला होता. महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग

महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या घालून महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग आहे, असा आरोपीह हर्षवर्धन यांनी केला आहे.भाजपशासित राज्यांचा विषय एका ओळीत संपवला

एकीकड़े महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना हर्षवर्धन यांनी भाजपशासित राज्यांमधील परिस्थितीचा ओझरता उल्लेख करत त्यांचा विषय एका वाक्यात संपवला आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थान या राज्यांनीही आपल्या आरोग्य व्यवस्था दर्जेदार कऱण्याचा सल्लाही दिला आहे.

Updated : 8 April 2021 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top