Home > News Update > राज्यसभेनंतर विधानपरीषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम : निवडणुक अटळ

राज्यसभेनंतर विधानपरीषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम : निवडणुक अटळ

राज्यसभेनंतर विधानपरीषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम : निवडणुक अटळ
X

राज्यसभेच्या (rajyasabha) विजयानं आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं (BJP)अधिक आक्रमक होत पाचवा उमेदवार कायम ठेवल्यानं महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी भाजप पुरस्कृत अपक्ष सदाभाऊ खोत (sadabhau khot) आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे (shivaji garje) यांची माघार घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आमचा पाचवा उमेदवार जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन अर्ज कायम असल्यानं १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज आहेत. विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे ५, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली गेली होती. तर, भाजपच्या पाठिंब्यावर सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर ११ अर्ज कायम राहिल्यानं विधानपरिषदेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.

शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर त्यांची आक्रमकता वाढली आहे. भाजपनं विधानपरिषदेसाठी ५ उमेदवार दिले आहेत. भाजपनं राज्यसभा निवडणुकीत पहिल्या पसंतीची १२३ मतं मिळवली होती. तर, महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६२ मतं मिळाली होती. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्यानं विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करावी, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, काँग्रेसकडून दोन पैकी एकाही उमेदवाराचा अर्ज मागे न घेण्यात आल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पाचवा उमेदवार जिंकेल असा विश्वास व्यक्त केल्यानं आता महाविकास आघाडीला त्यांचे सहा उमेदवार जिंकण्यासाठी आव्हान निर्माण झाले आहे.

Updated : 13 Jun 2022 12:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top