इंदुरीकर महाराज संतापले, "जो उठल तो मला घोडा लावतो"
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Jun 2022 5:39 PM IST
X
X
जळगाव : आपण फक्त खरे बोलतो आणि त्याची फळंही भोगतो, या शब्दात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी खंत व्यक्त केली आहे. जो उठल तो आपल्याला घोडा लावतो, पण तरीही आपण खरे बोलतो, असे त्यांनी आपल्या किर्तनात सांगितले. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर "आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे जो कष्ट करतो त्याला पगार कमी आणि जो करत नाही त्याला जास्त पगार असतो, त्यामुळे बुद्धी चेक करून पगार दिला पाहिजे" असेही इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.
Updated : 6 Jun 2022 5:39 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






