T20: भारताचा दणदणीत विजय, 39 चेंडूत संपवला सामना, स्कॉटलंडवर 8 विकेट्सनी विजय
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Nov 2021 4:31 PM GMT
X
X
भारतीय संघाने स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने नमवल्याने भारताला गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. नाणेफेक जिंकत विराटने गोलंदाजीचा निर्णय घेतला. अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय बरोबर करुन दाखवला. ज्यामुळे स्कॉटलंडला संघ केवळ 85 धावांमध्ये सर्वबाद झाला आहे. आता भारतासमोर केवळ 86 धावांचे आव्हान होते.भारतीय संघाने केवळ 39 चेंडूत सामना संपवला, आणि स्कॉटलंडवर 8 विकेट्सनी विजय मिळवला.
के एल राहुल आणि रोहित शर्माने उत्तम सुरुवात केली. राहुलने 18 चेंडूत 50 धावा केल्या. तर रोहितनेही 30 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Updated : 5 Nov 2021 4:31 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire