“सॅटेलाइट फोटोत चीनने आपल्या जमिनीचा ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय”: राहुल गांधी
X
लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये कोणतीही घुसखोरी झालेली नाही. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केला. पण यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.
“चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असा सवाल राहुल यांनी केला होता.
PM has surrendered Indian territory to Chinese aggression.
If the land was Chinese:
1. Why were our soldiers killed?
2. Where were they killed? pic.twitter.com/vZFVqtu3fD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 20, 2020
त्यानंतर राहुल गांधी यांच्या या प्रश्नानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं होतं.
या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी यात राजकारण करू नका, असं केलं होतं. हा व्हिडीओ ट्विट करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं होतं.
आजही राहुल यांनी मोदींना तिखट सवाल करत मोदींना घेरण्यासाठी दोन ट्विट केलं आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलं. हे ट्विट करताना राहुल गांधींनी जपान टाईम्सनं मोदींच्या रणनितीवर लिहिलेला लेख जोडला आहे.
Narendra Modi
Is actually
Surender Modihttps://t.co/PbQ44skm0Z
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2020
त्यानंतर पुन्हा एकदा ‘आज तक’ या वृत्त वाहिनीचे सीमेवरील फोटो ट्विट केले आहे.
“पंतप्रधानांनी भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं म्हटलं आहे. पण सॅटेलाइट फोटोत चीनने पँगाँग येथे पवित्र भारतीय जमिनीचा ताबा घेतल्याचं दिसत आहे”.
असं म्हणत मोदींवर प्रश्नांचे बाण सोडले आहेत.
प्रधानमंत्री ने कहा- ना कोई देश में घुसा, ना ही हमारी ज़मीन पर किसी ने कब्ज़ा किया।
लेकिन सैटेलाइट फ़ोटो साफ़ दिखाती हैं कि चीन ने पैंगोंग झील के पास भारत माता की पावन धरती पर कब्ज़ा कर लिया है।pic.twitter.com/BniFenomBb
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2020