Home > News Update > परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णया शिवाय पर्याय नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णया शिवाय पर्याय नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णया शिवाय पर्याय नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
X

राज्यात पुन्हा मोठा कोरोनाचा उद्रेक झाला असून काल सर्वोच्च ३० हजार रुग्णाची नोंद झाल्यानंतर आजही २५ हजार कोरोना रुग्ण नोंदवल्यानं कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोरोना बाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज भयानक आकडे समोर येत आहेत. यात विशेषकरुन मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे.


राज्यात आज 24,645 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19,463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2234330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 215241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22% झाले आहे. आज एकुण 58 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोना मृत्यूदर 2.13% इतका आहे.

Updated : 22 March 2021 4:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top